आंबेजोगाई तालुक्यातील पिंपरी घाट येथील जेवणातून २०६ जणांना विषबाधा
अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाईतालुक्यातील पिंपरी (घाट) गावात दुपारी गाव जेवण कार्यक्रमानंतर सुमारे २०६ जणांना विषबाधा झाली. यातील ३५ गंभीर रुग्णांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इत्र रुग्णांवर आरोग्य विभागाच्या टीमने गावातच उपचार केले.पिंपरी येथे जागृत हनुमान देवस्थान आहे. या मंदिरात भक्त गावजेवण देण्याची प्रथा पाळतात. बुधवारी दुपारी गावात गाव जेवणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पहाटेपासून अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी अशा तक्रारी जाणवू लागल्या. यानंतर ग्रामस्थांना घेऊनभातातून विषबाधा झाल्याचा निष्कर्षगाव जेवणासाठी जवळपास १ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. वरण, भात, भाजी, पोळी, मठ्ठा, बुंदी असा जेवणाचा बेत होता. कडक ऊन व लवकर शिजवलेला भात व उशिरा झालेले जेवण यामुळे भातातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.सरपंच काशिनाथ कातकडे यांनी त्वरित स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.